Give a missed call to order – 9096633907

पावसाळी हवामानात उन्हाळी बाजरी व भुईमुगाची अशी घ्या काळजी..
Crop care

tomato bajarbhav : सध्या राज्यात उत्तर व मध्य महाराष्ट्रासह अनेक भागात १७ ते २१ मे २०२५ या कालावधीत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. यासोबतच ढगाळ हवामान, ३३ ते ३४ अंश सेल्सिअस दरम्यानचे कमाल तापमान आणि २३ ते २५ अंश सेल्सिअस दरम्यानचे किमान तापमान राहणार आहे. वाऱ्याचा वेगही ७ ते ११ किमी प्रतितास इतका राहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी पुढील आठवड्यातील हवामान बदलांचा विचार करून पीक व्यवस्थापनाचे नियोजन करणे गरजेचे आहे.

उन्हाळी बाजरी पिक सध्या दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. यामुळे या पिकावर येणाऱ्या कीड व रोगांचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात होण्याची शक्यता आहे. केसाळ अळी, खोड कीड, सोस अथवा दहंगे अशा किडीमुळे ५० ते ६० टक्क्यांपर्यंत उत्पादन घटू शकते. या किडीच्या नियंत्रणासाठी वारा शांत असताना पाराथिऑन २ टक्के ८ किलो प्रति एकर धुरळणीसाठी वापरावे. मात्र हवामान ओलं असल्यास किंवा पावसाचा अंदाज असल्यास ही धुरळणी टाळावी.

उन्हाळी भुईमुग पिक सध्या शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे. यावेळी शेंगांची वाढ व वजन योग्य राहण्यासाठी ०:०:५० स्फुरद व पोटॅशचे मिश्रण (७५ ग्रॅम प्रति १५ लिटर पाणी) आणि मल्टी मायक्रो न्यूट्रिएंट (५० ग्रॅम) मिसळून फवारणी करावी. पान कुरतडणारी किंवा गुंडाळणारी अळी दिसल्यास डेल्टामेथ्रिन २५ ईसी २ मि.ली. किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रिन ५ ईसी ०.६ मि.ली. प्रति लिटर पाण्यातून फवारणी करावी. पुढील फवारण्या गरजेनुसार १० दिवसांच्या अंतराने घ्याव्यात. पावसाचा अंदाज असल्यास ही कामे कोरड्या हवामानातच पूर्ण करावीत.

वेलवर्गीय पिकांवर काळा करपा, डाऊनी मिल्ड्यूसारख्या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असून त्यासाठी योग्य कीडनाशक व फफूंदनाशकांची फवारणी तज्ज्ञांच्या सल्ल्याने करावी. त्याचबरोबर मेघगर्जनेसह वाऱ्याचा जोर, विजांचा कडकडाट याचा धोका लक्षात घेता जनावरांचे संरक्षण करणे, भाजीपाला आणि फळांची काढणी वेळेवर करून सुरक्षित ठेवणे, प्लास्टिक किंवा ताडपत्रीने झाकून ठेवणे अशा उपाययोजना तातडीने कराव्यात.11:31 AM

Source :- krishi24.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *