शासनाच्या आर्थिक सहाय्य योजनेचा लाभ कोणत्याही मध्यस्थांच्या हस्तक्षेपाशिवाय पात्र लाभार्थ्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यांमध्ये पोहोचावा, यासाठी महाराष्ट्र राज्याने ई-केवायसी प्रक्रिया सुरू केली आहे.यशस्वीरित्या आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच एकवेळ अनुदान वितरणासाठी पात्र ठरतात. त्यामुळे आर्थिक सहाय्य योजनेंतर्गत लाभ प्राप्त करण्यासाठी शेतकऱ्यांनी आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक आहे.
ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे टप्पे
१) ई-केवायसी करण्यासाठी https://scagridbt.mahait.org/ या संकेतस्थळाला भेट द्या.
२) वितरण स्थिती ‘(Disbursement Status’ )या ऑपशन वर क्लिक करा.
३) आपल्या आधार नंबर Enter Aadhaar Number’ या बॉक्स मध्ये टाका.
४) captcha रकान्यात दिलेल्या सांकेतिक अंक-अक्षरांची नोंद करा.
वापरकर्त्याला पुढील पृष्ठ दिसून येईल. त्या पृष्ठावर दोन पर्याय ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दिसतील.
ओटीपी आधारित ई-केवायसी..
१) ‘OTP’ या ऑपशन वर क्लिक करा.
२) तुमच्या आधार-संलग्न मोबाईल नंबर वर ओटीपी प्राप्त होईल.
३) ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी हा ओटीपी टाका.
४) ‘Get Data’ या ऑपशन क्लिक करा.
५) मोबाईलवर प्राप्त ओटीपीसोबत तुम्ही नोंद केलेला ओटीपी जुळल्यास ई-केवायसी प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण होईल.
बायोमेट्रिक आधारित ई-केवायसी…
१) ‘Biometric’ या ऑपशन वर क्लिक करा.
२) यंत्रणेमध्ये स्थापित केलेल्या उपलब्ध उपकरणांमधून वापरकर्त्याने योग्य ऑपशनची निवड करावी.
३) Biometric उपकरणाचा दिवा प्रकाशित होईल.
४) आपले बोट या प्रकाशित भागावर वापरकर्त्याने ठेवून दाबावे.
५) बायोमेट्रिकची नोंद घेतली जाईल व ती यशस्वीरित्या पूर्ण झाल्याचा मेसेज दिसू लागेल.
६) Validate UID वर क्लिक करावे .
७) ई-केवायसी यशस्वीरित्या पूर्ण होईल.